अमली पदार्थांचा चोरटा व्यापार; दोघांना अटक   

मुंबई : कोडीयन या अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या दोन सराईत आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून कोडीयन सिरपच्या २४० बाटल्या जप्त करण्यात आल केल्या आहेत.रफिक सय्यद (४५) आणि वहाबुल खान (२८) अशी या अटक आरोपींची नावे असून दोघेही गोवंडी परिसरातील राहणारे आहेत. गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात दिवसेंदिवस अमली पदार्थांचा चोरटा व्यापार  वाढत असून, चोरटा व्यापार रोखण्यासाठी परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे एक पथक मंगळवारी रात्री परिसरात गस्त घालत होते. यावेळी येथील नारायण डेअरी परिसरात दुचाकीवरून जाणार्‍या दोघांचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील गोणीची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात कोडीयनच्या २४० बाटल्या आढळल्या. त्यांची किमत १ लाख २० हजार रुपये आहे. 

Related Articles