E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
घटना हा भारतीय लोकशाहीचा आत्मा
Wrutuja pandharpure
05 Feb 2025
अॅड. सतिश गोरडे यांचे प्रतिपादन
पिंपरी
: ’संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे!’ असे प्रतिपादन ड. सतिश गोरडे यांनी मंगळवारी केले.
महात्मा फुले महाविद्यालयाचा इतिहास विभाग, आय क्यू ए सी आणि दर्द से हमदर्द तक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान गौरव विशेष व्याख्यानात ड. गोरडे बोलत होते. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले अध्यक्षस्थानी होते, साहित्यिक प्रदीप गांधलीकर, प्रा. डॉ. संगीता अहिवळे, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे, पिंपरी - चिंचवड डव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गौरव वाळुंज, सचिव ड. उमेश खंदारे आणि पदाधिकारी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
ड. गोरडे पुढे म्हणाले की, ’२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान अस्तित्वात आले असले तरी त्यापूर्वी सुमारे तीन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर मसुदा समिती त्यावर काम करीत होती. सलग १४१ दिवस उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून संविधानाला सजीव करण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केले. ज्याप्रमाणे दूध हे प्रक्रिया केली नाही तर नासून खराब होते, त्याचप्रमाणे समाजातील सर्व घटकांना जर समान न्याय मिळाला नाही तर लोकशाहीतील अंतर्गत असंतोषाचा उद्रेक होऊ शकतो, याची जाणीव त्यांना होती. संविधानातील ३९५ कलमांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानता, बंधुभाव आणि देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी योगदान दिले. पुढे परिस्थितीनुरूप त्यामध्ये कलमांची संख्या वाढविण्यात आली; तसेच बहुमताने घटनादुरुस्तीही करण्यात आली आहे. देश आता संविधानाचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना संविधानाचा आदर अन् सन्मान राखून प्रत्येक भारतीयाने मूलभूत हक्क उपभोगताना नैतिक कर्तव्यांचेही पालन केले पाहिजे!’ दृष्टान्तकथा आणि विविध उदाहरणे उद्धृत करीत ड. गोरडे यांनी विद्यार्थ्यांसहित सर्व उपस्थितांना संविधानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रा. भाऊसाहेब सांगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. नीळकंठ डहाळे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रा. संग्राम गोसावी आणि प्रा. डॉ. प्रतिमा कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. संदीप नन्नावरे यांनी आभार मानले.
Related
Articles
दुबईत भारतीय संघाचा विक्रम
11 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
‘गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य होते’
10 Mar 2025
राज्यावर ८ हजार कोटींचे कर्ज असताना पुरवणी मागण्यांतून तिजोरीवर डल्ला
08 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
पाणी टंचाई वाढणार; ४७३ गावांना बसणार झळ!
15 Mar 2025
दुबईत भारतीय संघाचा विक्रम
11 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
‘गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य होते’
10 Mar 2025
राज्यावर ८ हजार कोटींचे कर्ज असताना पुरवणी मागण्यांतून तिजोरीवर डल्ला
08 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
पाणी टंचाई वाढणार; ४७३ गावांना बसणार झळ!
15 Mar 2025
दुबईत भारतीय संघाचा विक्रम
11 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
‘गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य होते’
10 Mar 2025
राज्यावर ८ हजार कोटींचे कर्ज असताना पुरवणी मागण्यांतून तिजोरीवर डल्ला
08 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
पाणी टंचाई वाढणार; ४७३ गावांना बसणार झळ!
15 Mar 2025
दुबईत भारतीय संघाचा विक्रम
11 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
‘गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य होते’
10 Mar 2025
राज्यावर ८ हजार कोटींचे कर्ज असताना पुरवणी मागण्यांतून तिजोरीवर डल्ला
08 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
पाणी टंचाई वाढणार; ४७३ गावांना बसणार झळ!
15 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
3
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
4
येमेनजवळ चार नौका बुडून १८६ जण बेपत्ता
5
मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा
6
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले