सचिन तेंडूलकर-युवराज सिंगच्या फलंदाजीमुळे इंडीया मास्टर्सचा विजय   

रायपूर : भारतात सध्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत नसलेले खेळाडू सध्या या स्पर्धेत खेळत आहेत. भारताने आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये ऑस्ट्रेलियाला ९४ धावांनी पराभूत केले. या विजयानंतर भारत अंतिम फेरीत पोहोचला आहे.  रायपूरमध्ये झालेल्या मॅचमध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बळीवर २२०  धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा संघ १८.१ षटकांमध्ये १२६ धावांवर बाद झाला. 
 
भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बळीवर २२० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियापुढे २२१  धावांचे आव्हान होते. भारताला या धावसंख्येंपर्यंत पोहोचवण्यामध्ये युवराज सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली. युवराज सिंगने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली होती. त्याच प्रकारे ऑस्ट्रेलिया मास्टर्स संघा विरोधात कारवाई केली. युवराज सिंगने त्याच्या डावात सात षटकार मारले. 
 
युवराज सिंगने ३० बॉलमध्ये ७ षटकार अन् एक चौकार मारत ५९ धावांची खेली केली. यामुळे भारताने २०० धावांचा टप्पा पार केला. यापूर्वी भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. अंबाती रायडू ५ धावा करुन बाद झाला. पवन नेगीने १४  धावा केल्या. इंडिया मास्टर्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरने ३० चेंडूमध्ये ४२ धावा केल्या. स्टूअर्ट बिन्नीने ३६  तर यूसुफ पठाणने २३ धावा केल्या. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २२१  धावांचे आव्हान ठेवले होते.
 
ऑस्ट्रेलिया मास्टर्सचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. शेन वॅटसन ५  धावांवर बाद झाला. शॉन मार्श आणि बेन डंक यांनी प्रत्येकी २१-२१  धावा केल्या डॅनियल २ धावांवर माघारी परतला. नाथन रेडर्न २१ धावा करु शकला.  नाथनजीरो स्टीव ओकीफ शुन्यावर बाद झाला. बेन कटिंगनं  ३९ धावांवर बाद झाला. भारताकडून शहबाज नदीमनं ४, इरफान पठाण आणि विनय कुमार यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतल्या. दरम्यान, भारताने आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. श्रीलंका मास्टर्स आणि वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यात आज सामना होईल. यामध्ये जो संघ विजय मिळवेल. त्यांच्या विरुद्ध भारत मास्टर्स संघाचा सामना होईल. 
 

Related Articles