E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मुर्शिदाबादमधून ५०० कुटुंबांचे पलायन
Samruddhi Dhayagude
15 Apr 2025
कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. भीतीमुळे ५०० हून अधिक हिंदू कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. बीएसएफवर गोळीबार, घरे जाळणे आणि मंदिरांची तोडफोड केल्याचा आरोप हिंसक जमावावर आहे. आतापर्यंत १५० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपने एनआयए चौकशीची आणि लष्कराचा विशेष कायदा लागू करण्याची मागणी केली आहे.
बंगालच्या मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंसाचारानंतर तणाव निर्माण झाला आहे; परंतु तेथील हिंदू भीतीच्या छायेत आहेत. जिल्ह्यातील हिंसाचारामुळे प्रभावित सुमारे ५०० हिंदू कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. त्यांनी भागीरथी नदी ओलांडून मालदा जिल्ह्यात आश्रय घेतला. कट्टरपंथीयांच्या भयामुळे त्यांना पळून जाण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला. अनेकजण झारखंडलाही गेले आहेत. तृणमूल काँग्रेसचे आमदार मनिरुल इस्लाम हेही फरक्का येथून पळून गेल्याचे वृत्त आहे. त्याचे घराला कुलूप आहे. दुसरीकडे, हिंसाचारग्रस्त शमशेरगंजमध्ये, बदमाशांनी पुन्हा बीएसएफ पथकावर गोळीबार केला आहे. हिंसाचारात दोन मुले जखमी झाली आहेत. गुन्हेगारांनी अनेक महिलांचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे.
तलावात विष मिसळल्याने मासे मृत्युमुखी
धुलियान भागातील एका घरावर हल्ला करण्यासाठी साठवून ठेवलेले दगड बीएसएफने नुकतेच काढून टाकले. मुर्शिदाबादमध्ये सुमारे हिंदूंची २०० घरे जाळण्यात आली. गॅस सिलिंडर उघडून त्यात पेट्रोल ओतल्यामुळे आग लागल्याचा आरोप नागरिकांनी केला. दंगलखोरांनी मोठ्या प्रमाणात घरे आणि दुकाने लुटली आणि आग लावली. अनेक तलावांमध्ये काही गुन्हेगारांनी विष मिसळल्यामुळे मोठ्या संख्येने मासे मृत्युमुखी पडले. सुपारीच्या बागांमध्येही त्यांनी जाळपोळ केली.
एनआयएकडून चौकशी व्हावी
राज्य भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी दावा केला की, दोन मंदिरांची तोडफोड जमावाने केली. या घटनेची चौकशी एनआयएकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त आणि संवेदनशील भागात केंद्रीय दलांच्या १७ कंपन्या तैनात केल्या आहेत. यामध्ये बीएसएफच्या नऊ कंपन्या आणि सीआरपीएफच्या आठ कंपन्यांचा समावेश आहे. शनिवारी रात्रभर बीएसएफ जवानांनी सुती आणि शमसेरगंज पोलिस स्टेशन परिसरात गस्त घातली.
Related
Articles
चार कोटींचे अमली पदार्थ जप्त
17 Apr 2025
शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
18 Apr 2025
बांगलादेश-पाकिस्तानमध्ये १५ वर्षांनंतर द्विपक्षीय चर्चा
18 Apr 2025
रोहित शर्मा मुंबई लीगच्या तिसर्या हंगामाचा चेहरा
20 Apr 2025
भाजपची तामिळ खेळी
20 Apr 2025
कंत्राटी कामगाराला प्राप्तिकरची ३१४ कोटींची नोटीस
21 Apr 2025
चार कोटींचे अमली पदार्थ जप्त
17 Apr 2025
शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
18 Apr 2025
बांगलादेश-पाकिस्तानमध्ये १५ वर्षांनंतर द्विपक्षीय चर्चा
18 Apr 2025
रोहित शर्मा मुंबई लीगच्या तिसर्या हंगामाचा चेहरा
20 Apr 2025
भाजपची तामिळ खेळी
20 Apr 2025
कंत्राटी कामगाराला प्राप्तिकरची ३१४ कोटींची नोटीस
21 Apr 2025
चार कोटींचे अमली पदार्थ जप्त
17 Apr 2025
शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
18 Apr 2025
बांगलादेश-पाकिस्तानमध्ये १५ वर्षांनंतर द्विपक्षीय चर्चा
18 Apr 2025
रोहित शर्मा मुंबई लीगच्या तिसर्या हंगामाचा चेहरा
20 Apr 2025
भाजपची तामिळ खेळी
20 Apr 2025
कंत्राटी कामगाराला प्राप्तिकरची ३१४ कोटींची नोटीस
21 Apr 2025
चार कोटींचे अमली पदार्थ जप्त
17 Apr 2025
शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
18 Apr 2025
बांगलादेश-पाकिस्तानमध्ये १५ वर्षांनंतर द्विपक्षीय चर्चा
18 Apr 2025
रोहित शर्मा मुंबई लीगच्या तिसर्या हंगामाचा चेहरा
20 Apr 2025
भाजपची तामिळ खेळी
20 Apr 2025
कंत्राटी कामगाराला प्राप्तिकरची ३१४ कोटींची नोटीस
21 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!