E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
विचारांची पुंजी जपायला हवी
Wrutuja pandharpure
13 Apr 2025
उर्मिला राजोपाध्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यस्मरण करताना त्यांच्या विचार आणि आचारांची उजळणी होण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. आज घटनेविषयी बरेच बोलले जाते. त्यावर राजकारणाचे डाव खेळले जात आहेत. परंतु या काळात बाबासाहेबांंनी दाखवलेल्या आदर्शांचा अवलंब करायला हवा. तरच देशाचे भविष्य उजळेल आणि लोकशाही बुलंद राहू शकेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जयंती दिन. महान नेते असणार्या बाबासाहेबांनी आयुष्यभर दलित, मागास , शोषित आणि पीडित वर्गांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी संघर्ष केला. आजच्या काळात त्यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात, कारण आजही जातीव्यवस्था, लिंगभेद, निरक्षरता आणि आर्थिक विषमता हे समाजाला भेडसावणारे मुख्य प्रश्न आहेत. त्यामुळेच यासंबंधी बाबासाहेबांनी केलेले मार्गदर्शन समाजाला प्रेरित करणारे ठरेल. उदाहरणार्थ, आजच्या काळात महिलांचे अधिकार, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाचे कल्याण आणि सर्व लोकांना समान संधी देणे यासाठी बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घेणे गरजेचे ठरते. घटनेने दिलेल्या अधिकारांचा फायदा घेत आजची तरुणाई प्रगती साधू शकते.
डॉ. आंबेडकर यांनी समाजातील जातीव्यवस्थेला विरोध केला आणि सर्व माणसांना समान अधिकार मिळावेत यासाठी काम केले. समानतेच्या आधारावर समाजाची उभारणी झाली तरच मानवतेला खरी दिशा मिळेल, असे ते म्हणत. बाबासाहेबांनी शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिले. शिक्षण हेच माणसाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे आयुध आहे, असे त्यांचे मत होते. त्यांनी दलित आणि मागासवर्गीय समाजांना शिक्षण घेण्याचे महत्त्व सांगितले. आजही, त्यांचा हा विचार युवा पिढीला प्रेरित करणारा आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार असणार्या बाबासाहेबांची भूमिका सर्व व्यक्तींसाठी समान अधिकार, धर्मनिरपेक्षता, आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारित होती. हे विचार आजच्या भारतीय राजकारणासाठी तसेच न्यायव्यवस्थेत महत्त्वाचे आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ सामाजिक सुधारक नव्हते तर त्यांनी आर्थिक विषमतेवरही भाष्य केले. आर्थिक समानता हीच खर्या सामाजिक बदलाची गुरुकिल्ली आहे, असे त्यांचे मत होते. डॉ.आंबेडकरांनी हिंदू धर्मातील असमानता आणि शोषणाला विरोध करत बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी धर्माच्या बाबतीत स्वतंत्रता, समानता, बंधुता ही तत्वे मार्गदर्शक म्हणून स्वीकारली. या विचारांमुळे लाखो लोकांनाही धर्मांतर करण्याची प्रेरणा मिळाली. डॉ. आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कासाठीही लढा दिला. त्यांच्या कार्यामुळे महिलांना आरोग्य, शिक्षण आणि समान अधिकार मिळवण्यासाठी अधिक संधी प्राप्त झाल्या. उत्तम कायदे तज्ज्ञ असल्यामुळे ते कायम महिलांच्या हक्कांबाबत काम करत राहिले. डॉ. आंबेडकर हे राजकीय जागरूकतेचे प्रबल समर्थक होते. राजकारण हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांचे मत होते. त्यांच्या विचारांमुळेच आज दलित आणि मागासवर्गीय लोक राजकारणात सक्रिय होण्याचे प्रयत्न करताना दिसतात. या दृष्टीने त्यांचे विचार आजही प्रभावी ठरतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत, वर्षातले चार महिने शेतकरी बेरोजगार असतो. हे लक्षात घेऊन शेतकर्यांसाठी पूरक उद्योग निर्माण होण्याची आवश्यकता आहे. परंतु बाबासाहेबांच्या या शिकवणीकडे आजतागायत म्हणावे तसे लक्ष देण्यात आले नाही. आजही अनेक तज्ज्ञ शेतीला पूरक उद्योग निर्माण करण्यावर भर द्यावा, असा आग्रह धरत आहेत. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते.सद्यस्थितीत सगळ्यांनी डॉ. आंबेडकरांचे सामाजिक न्यायाचे तत्त्व अंगिकारणे महत्त्वाचे आहे. तरच सगळ्या समाजाला विकासाच्या समान संधी प्राप्त होतील आणि संपूर्ण समाजाची विकासाकडे वेगाने वाटचाल होऊ शकेल. त्यातून देशाच्या संपूर्ण विकासाचे स्वप्न पूर्ण होणे शक्य होईल.
आजही देशातली गरिबी, दारिद्र्य कमी करण्याचे आव्हान कायम आहे. अशा परिस्थितीत दारिद्र्य निर्मूलनाचा कालबध्द कार्यक्रम हाती घेणे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. बेकारी, गरिबी याविरूध्दचा लढा हे देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे मुख्य सूत्र होते.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातल्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, सावकारी रद्द केली. सामान्य जनतेला याचा फायदा झाला. तसा काही कार्यक्रम आज राबवला जाणार का, हा खरा प्रश्न आहे. आज बँकिंग व्यवस्थेचा लाभ केवळ धनदांडग्यांनाच होताना दिसत आहे. यातल्या काही मंडळींकडे असणारी कोट्यवधीची कर्जाची थकबाकी विचार करायला लावणारी आहे. बँका डबघाईला आणून देशाबाहेर पळून गेलेले धनदांडगेही आपल्याला माहित आहेत. हे सगळे लक्षात घेता सामान्यांना दिलासा देणारी बँकिंग व्यवस्था घडवण्याचे आव्हानही सरकारपुढे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या भारतीय घटनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ही घटना सादर करताना बाबासाहेब म्हणाले होते, ‘आज आपण एका विसंगत जगात प्रवेश करत आहोत. एका बाजूला राजकीय समता प्रस्थापित होत असताना दुसरीकडे सामाजिक विषमता कायम आहे. अशा वेळी ही घटना नीट राबवली गेली नाही तर घटनेचा डोलारा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.’ या पार्श्वभूमीवर दलितांवरील वाढते अन्याय-अत्याचार तसेच स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना व्यथित करणार्या आहेत. आपला सामाजिक अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार हे सारे खपवून घेतले जाईल अशी प्रवृत्ती काहीजणांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत लोकशाहीचे आणि घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी मोठी असून तसा विचार व्यापक प्रमाणावर व्यक्त होणे गरजेचे आहे.
आज जागतिकीकरणाच्या नावाखाली शेतकरी आणि अन्य समाज उद्ध्वस्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. या समस्येवर प्रगत म्हणवणारा महाराष्ट्र मात करू शकला नाही तर ती शोकांतिका ठरेल. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आणि मूल्यांची प्रकर्षाने आठवण होते. त्यांना अभिप्रेत असणारे सामाजिक परिवर्तन अजूनही झालेेले नाही. त्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन परिवर्तनाद्वारे समतेचा लढा लढण्याचा निर्धार व्यक्त व्हायला हवा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने लोकशाहीचे सामाजिकीकरण हा मुद्दाही विचारात घेण्यासारखा आहे. अलिकडे देशात जातीय, धार्मिक अस्मिता अधिक घट्ट होऊ लागल्या आहेत. एखाद्या गोष्टीचा फायदा आपल्या जातीबांधवांना वा धर्मबांधवांनाच व्हावा असा आग्रह धरला जात असून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकर्यांच्या आत्महत्त्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. असंघटित कामगारांचा प्रश्न गंभीर आहे. यातून निर्माण होणारी आर्थिक विषमता चिंताजनक आहे. ती देशाच्या विकासातही अडसर ठरते. या सगळ्यातून येणार्या चिंतेच्या मुक्तीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करणे आणि ती स्वीकारणे हा खात्रीचा उपाय आहे.
Related
Articles
‘आपले सेवा केंद्र’ चालकांकडून नागरिकांची लूट
12 Apr 2025
निर्देशांक उसळला
12 Apr 2025
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
14 Apr 2025
युरोपमध्ये गुराढोरांना तोंड, पायाचे आजार
13 Apr 2025
मावळमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
13 Apr 2025
कर्मचार्यांचे हित जपणारी कंपनी
17 Apr 2025
‘आपले सेवा केंद्र’ चालकांकडून नागरिकांची लूट
12 Apr 2025
निर्देशांक उसळला
12 Apr 2025
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
14 Apr 2025
युरोपमध्ये गुराढोरांना तोंड, पायाचे आजार
13 Apr 2025
मावळमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
13 Apr 2025
कर्मचार्यांचे हित जपणारी कंपनी
17 Apr 2025
‘आपले सेवा केंद्र’ चालकांकडून नागरिकांची लूट
12 Apr 2025
निर्देशांक उसळला
12 Apr 2025
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
14 Apr 2025
युरोपमध्ये गुराढोरांना तोंड, पायाचे आजार
13 Apr 2025
मावळमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
13 Apr 2025
कर्मचार्यांचे हित जपणारी कंपनी
17 Apr 2025
‘आपले सेवा केंद्र’ चालकांकडून नागरिकांची लूट
12 Apr 2025
निर्देशांक उसळला
12 Apr 2025
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
14 Apr 2025
युरोपमध्ये गुराढोरांना तोंड, पायाचे आजार
13 Apr 2025
मावळमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
13 Apr 2025
कर्मचार्यांचे हित जपणारी कंपनी
17 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
तहव्वुर राणाला घेऊन NIA पथक दिल्लीत दाखल
6
जेजुरी गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा घोषित