E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
वक्फ मंडळावर नियंत्रण नाही; कायद्यानुसार कामकाज व्हावे : नड्डा
Samruddhi Dhayagude
07 Apr 2025
नवी दिल्ली : केंद्र सरकार वक्फ मंडळावर नियंत्रण ठेवू इच्छित नाही; परंतु ते कायद्याच्या कक्षेत काम करतात की, नाही हे सुनिश्चित करायचे आहे. जेणेकरून त्यांच्या मालमत्तेचा वापर मुस्लिम समाजातील शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगार वाढविण्यासाठी केला जाऊ शकेल, असे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी सांगितले.
भाजपच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त भाजपच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना नड्डा म्हणाले, तुर्की आणि इतर अनेक मुस्लिम देशांच्या सरकारांनी वक्फ मालमत्तांवर ताबा मिळवला आहे. आम्ही फक्त वक्फ मंडळ चालवणार्या लोकांना नियमानुसार काम करण्यास सांगत आहोत. आम्हाला वक्फ मंडळावर नियंत्रण नको आहे. आमचे ध्येय फक्त कामकाज सुनिश्चित करणे आहे. वक्फ मंडळाची मालमत्ता आणि संपत्ती मुस्लिम समुदायाला शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधी प्रदान करण्यासाठी समर्पित केली जाईल.
दरम्यान, शाहबानो प्रकरणात राजीव गांधी सरकार मुस्लिम समाजातील काही घटकांच्या दबावाला बळी पडून तुष्टीकरणाच्या राजकारणाला बळी पडले. न्यायालयाने मुस्लिम महिलांच्या सुटकेचे आवाहन करूनही निर्णायक कारवाई करण्याचे धाडस कोणाचेच झाले नाही. विशेष म्हणजे, मुस्लिम बहुसंख्य असलेल्या देशांनी तिहेरी तलाकची प्रथा आधीच रद्द केली होती, तरीही ती भारतात सुरूच होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तिहेरी तलाक रद्द करून मुस्लिम महिलांना सक्षम आणि स्वतंत्र करून ऐतिहासिक पाऊल उचलले.
केंद्रातील भाजप सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. १९८७-८८ मध्ये पालमपूरच्या अधिवेशनात अडवाणीजींच्या अध्यक्षतेखाली एक ठराव संमत करण्यात आला होता की, आम्ही रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करू. प्रदीर्घ लढ्यानंतर भव्य राम मंदिर बांधले गेले, असेही ते म्हणाले.
Related
Articles
तुम्ही खरंच निरोगी आहात का?
07 Apr 2025
हिंसाचार आणि धर्मवादामुळे देश द्वेषाच्या गर्तेत
09 Apr 2025
रांजणगाव येथे व्यावसायिकाची आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल
05 Apr 2025
‘ससून’च्या आवारात स्वतंत्र पोलिस चौकी
09 Apr 2025
आईने जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवले
09 Apr 2025
वैकुंठ स्मशानभूमीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यास यश
05 Apr 2025
तुम्ही खरंच निरोगी आहात का?
07 Apr 2025
हिंसाचार आणि धर्मवादामुळे देश द्वेषाच्या गर्तेत
09 Apr 2025
रांजणगाव येथे व्यावसायिकाची आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल
05 Apr 2025
‘ससून’च्या आवारात स्वतंत्र पोलिस चौकी
09 Apr 2025
आईने जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवले
09 Apr 2025
वैकुंठ स्मशानभूमीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यास यश
05 Apr 2025
तुम्ही खरंच निरोगी आहात का?
07 Apr 2025
हिंसाचार आणि धर्मवादामुळे देश द्वेषाच्या गर्तेत
09 Apr 2025
रांजणगाव येथे व्यावसायिकाची आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल
05 Apr 2025
‘ससून’च्या आवारात स्वतंत्र पोलिस चौकी
09 Apr 2025
आईने जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवले
09 Apr 2025
वैकुंठ स्मशानभूमीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यास यश
05 Apr 2025
तुम्ही खरंच निरोगी आहात का?
07 Apr 2025
हिंसाचार आणि धर्मवादामुळे देश द्वेषाच्या गर्तेत
09 Apr 2025
रांजणगाव येथे व्यावसायिकाची आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल
05 Apr 2025
‘ससून’च्या आवारात स्वतंत्र पोलिस चौकी
09 Apr 2025
आईने जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवले
09 Apr 2025
वैकुंठ स्मशानभूमीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यास यश
05 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
6
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन