व्हॉट्सऍप कट्टा   

शपथ

कोकणातले लोक देवभोळे, श्रद्धावान खर्‍या खोट्याचा निर्णय देवळात लावणारे, देवापुढे शपथ घेऊन कोणी खोटे बोलू शकणार नाही, असा विश्वास बाळगणारे त्या विश्वासास जागणारे.कोकणातल्या एका शेतकर्‍याची अवजारे गेली. शेतकर्‍याला वाटत होते, ती चोरली शेतकामावर येणार्‍या मजुरांनीच. पण चोरी केल्याचे कोणीच कबूल करीत नव्हते. शेवटी देवळात देवासमोर शपथेवर तसे प्रत्येकाने सांगावे असे गावकर्‍यांनी ठरवले. शेजारच्या गावात जागृत देवस्थान होते. तिथे जाऊन शपथ घेण्याचा निर्णय सगळ्यांना मान्य झाला.प्रमुख गावकर्‍यांसह शेतकरी शेतकामगारांना घेऊन शेजारच्या गावात पोचला. त्यांना दवंडी पिटलेली ऐकू येऊ लागली. जवळ गेल्यावर सगळे स्पष्ट ऐकू आले.‘ऐकाऽ हो ऐकाऽ, आपल्या गावातल्या देवळातील सुप्रसिद्ध घंटा चोरीला गेली आहे. जो कुणी चोर पकडून देईल, चोरी कुणी केली सांगेल त्याला मोठे बक्षीस दिले जाईल.दवंडी ऐकून शहाणा शेतकरी बरोबरच्या लोकांना म्हणाला, आपण इथूनच परतू. देवासमोरची घंटा चोरीला गेली. तिचा शोध लागत नाही. चोर सापडत नाही. मग माझी अवजारे चोरणार्‍या चोराचा पत्ता कसा लागणार?देवावर कितीही श्रद्धा असली तरी आपले प्रश्न सोडविण्यात अंधश्रद्धा उपयोगी पडत नाहीच.
----------
जीवनात योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. एखाद्या योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन तुमच्या जीवनाच्या दिशेला योग्य दिशा देऊ शकते. मार्गदर्शन केवळ एक सूचना नाही, तर ते तुम्हाला धैर्य, प्रेरणा, आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील प्रदान करते. योग्य व्यक्तीच्या अनुभवाने आणि ज्ञानाने तुम्ही आपल्या समस्यांवर त्वरित मात करू शकता आणि तुमचे भविष्य अधिक उज्ज्वल बनवू शकता. म्हणूनच, जीवनात योग्य मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ते आपल्याला ज्या गोष्टीत आपल्याला अडचणी येत आहेत, त्या सोडवण्यासाठी योग्य पद्धत दाखवते. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि तुमच्या यशाचा मार्ग अधिक सोप्पा बनवतो.
----------
मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे?
कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना..
मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.
कुल्फीवाला : अरे, पैसे दे की?
मुलगा : आमच्या घरचे म्हणत्यात खा, प्या मजा करा.. पण पैशाचा लाड नाही करायचा...
-----------
जेव्हा मेहनत करूनही स्वप्न पूर्ण होत नाहीत,
तेव्हा रस्ता बदला, ‘सिद्धांत‘ नाही.
कारण झाड नेहमी ’पान’ बदलतात ’मूळ’ नाही.
भगवद्गीतेत स्पष्ट लिहिले आहे-निराश होऊ नको ’कमजोर’ तुझी वेळ आहे ‘तू‘ नाही!
*****
मागितले तरी सुख उसने मिळत नाही.
प्रयत्नांशिवाय कधीच ध्येयाचे शिखर गाठता येत नाही.
आपल्या देवावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा.
‘योग्य वेळी तो एवढं देतो, की मागायला काहीच उरत नाही‘.
*****
दगडाचं तर ठीक आहे हो..... 
थोडा शेंदुर फासला म्हणजे
एकदा देव तरी तयार करता येईल
पण माणसाला असा कोणता रंग द्यावा
म्हणजे माणसाचा
माणूस बनवता येईल?
------------

Related Articles