E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
खेळाडूंनी संघाची साथ देणे महत्त्वाचे : कपिल देव
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
मुंबई : भारतीय क्रिकेट खेळाडूंसदर्भात बीसीसीआयने लागू केलेल्या नव्या नियमातील कुटुंबासंदर्भातील मुद्दा अजूनही गाजत आहे. आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधी विराट कोहलीने कुटुंबियांसंदर्भातील नियमावर नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयच्या या चर्चित आणि कठोर नियमाबद्दल भारताचे माजी क्रिकेटर आणि वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार कपिल देव यांनी आपल मत मांडले आहे. दिग्गज क्रिकेटरने विराट कोहलीच्या सुरात सूर मिसळला असला तरी फॅमिली आणि प्रोफेशन यात योग्य समतोल साधणं गरजेचे आहे, या गोष्टीवरही जोर दिला आहे.
पत्रकार परिषदेत संवाद साधताना कपिल देव यांनी बीसीसीआयच्या कुटुंबियांला दौर्यावर नेण्यासंदर्भातील नियमावर भाष्य केले. ते म्हणाले आहेत की, हा क्रिकेट बोर्डाचा निर्णय आहे. जर मला विचाराल तर हो.. खेळाडूंसाठी फॅमिली सोबत असणे गरजेची आहे. पण त्या खेळाडूने संघाची साथ देणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आमच्या काळात बोर्डाने सांगण्याआधी आम्ही पहिल्या हाफमध्ये खेळावर फोकस करायचो. दुसर्या हाफमध्ये कुटुंबियातील मंडळींनी सामन्याचा आनंद घेण्यासाठी बोलवायचो, असा दाखला देत कुटुंबियांना दौर्यावर नेत असताना समतोल साधणं गजरेजे आहे, अशा आशयाचे वक्तव्य कपिल देव यांनी केले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एका खास कार्यक्रमात विराट कोहलीनं अनेक मुद्यावर भाष्य केले. यावेळी त्याने बीसीसीआयने फॅमिलीसंदर्भात लागू केलेल्या नियमावर नाराजी बोलून दाखवली होती. कुटुंबियांची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते ते लोकांना पटवून देणं खूप कठिण आहे. त्याचे फायदे लोकांना समजत नाहीत, अशा शब्दांत त्याने बीसीसीआयच्या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, भारतीय संघाचा दौरा जर ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ असेल तरच खेळाडूंना १४ दिवस फॅमिलीला सोबत नेता येईल. त्यापेक्षा कमी दिवसांच्या दौर्यात खेळाडूंना कुटुंबियातील सदस्यांना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही खेळाडूंना या नियमाचे पालन करावे लागले होते.
Related
Articles
मुलाच्या खुनातील तपास अधिक महत्त्वाचा
24 Mar 2025
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खासगी प्रवासी बसला भीषण आग
26 Mar 2025
अॅमेझॉनवर होम, किचन आणि आऊटडोर्स बिजनेसमधे भरीव वाढ
28 Mar 2025
इलेक्ट्रिक बसऐवजी सीएनजी बससेवेला प्राधान्य
24 Mar 2025
बिहारच्या हिंदी भाषक विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये मारहाण
26 Mar 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
मुलाच्या खुनातील तपास अधिक महत्त्वाचा
24 Mar 2025
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खासगी प्रवासी बसला भीषण आग
26 Mar 2025
अॅमेझॉनवर होम, किचन आणि आऊटडोर्स बिजनेसमधे भरीव वाढ
28 Mar 2025
इलेक्ट्रिक बसऐवजी सीएनजी बससेवेला प्राधान्य
24 Mar 2025
बिहारच्या हिंदी भाषक विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये मारहाण
26 Mar 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
मुलाच्या खुनातील तपास अधिक महत्त्वाचा
24 Mar 2025
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खासगी प्रवासी बसला भीषण आग
26 Mar 2025
अॅमेझॉनवर होम, किचन आणि आऊटडोर्स बिजनेसमधे भरीव वाढ
28 Mar 2025
इलेक्ट्रिक बसऐवजी सीएनजी बससेवेला प्राधान्य
24 Mar 2025
बिहारच्या हिंदी भाषक विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये मारहाण
26 Mar 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
मुलाच्या खुनातील तपास अधिक महत्त्वाचा
24 Mar 2025
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खासगी प्रवासी बसला भीषण आग
26 Mar 2025
अॅमेझॉनवर होम, किचन आणि आऊटडोर्स बिजनेसमधे भरीव वाढ
28 Mar 2025
इलेक्ट्रिक बसऐवजी सीएनजी बससेवेला प्राधान्य
24 Mar 2025
बिहारच्या हिंदी भाषक विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये मारहाण
26 Mar 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
युपीआय व्यवहारावर कर?
2
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
3
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
4
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
5
जमिनी खालचे प्रदूषित पाणी एक गंभीर जागतिक समस्या
6
औटघटकेचे पंतप्रधान?