E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
एक ऋषी अनेक वर्षांपासून यज्ञ करायचा प्रयत्न होते; परंतु त्यांच्या यज्ञाला काही यश येत नव्हते. त्यांच्या आश्रमाजवळून एकदा राजा विक्रमादित्य चालले होते. त्यांनी त्या ऋषींची ही उदासीनता पहिली आणि म्हणाले. ’ऋषिवर! तुम्ही असे उदास का? राज्यात कोणी निराश आणि उदास राहिलेलं मला योग्य वाटत नाही.’ त्यावर ऋषी म्हणाले, महाराज! मी बर्याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करतो आहे; पण अपेक्षित अग्नी माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही.’ त्यावर राजे विक्रमादित्य म्यानातील तलवार काढून म्हणाले, ’एवढीच गोष्ट आहे ना! मी आता या क्षणी संकल्प करतो की, आज संध्याकळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी माझे शीर या तलवारीने कापून या यज्ञात आहुती देईन.’ यानंतर राजाने काही आहुत्या दिल्या व काही वेळातच त्या यज्ञात अग्नीदेव प्रकट झाले. अग्नीदेव राजांना म्हणाले, ’मी तुझ्यावर प्रसन्न आहे! वर माग!’ त्यावर राजा म्हणाले, ’या ऋषींची इच्छा पूर्ण करा! यांचा यज्ञ संपूर्ण करा! त्यांच्या यज्ञाचे त्यांना मनोवांच्छित फळ त्यांना मिळू दे!’ यावर ऋषी म्हणाले, ’राजा! मी अनेक प्रयत्न केले; पण मला शक्य झाले नाही. तुम्ही अग्निला प्रकट कसे केले?’ यावर राजा काही बोलण्या आधीच अग्निदेव उतरले, ’ऋषीवर! राजाने जे काही केलं त्यात त्यांचा स्वतःचा काहीच हेतु नव्हता आणि त्यांचे कार्य हे दृढ निश्चयाने आणि ध्यासपूर्वक केले होते. त्यामुळे ते कार्य सफल झाले. म्हणून मी त्वरित प्रकट झालो.’
तात्पर्य : संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करते.
--------
जोपर्यंत आपण स्वतःच्या मनात पराभवाचा विचार करत नाही, तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही. यश आणि अपयश यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे मानसिकता. आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रयत्न करण्याची तयारी हेच खरे विजेतेपदाचे गमक आहे. अनेकदा संकटे, अडथळे आणि अपयश येतात, पण त्यांच्याकडे शिक्षणाच्या दृष्टीने पाहिल्यास त्यातून नवी उमेद आणि अनुभव मिळतो. ज्या क्षणी आपण हार मानतो, त्या क्षणीच आपण खरोखर हरतो. पण जर आपण मनाशी ठरवले की कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न सोडायचे नाहीत, तर यश अवश्य मिळते. आत्मशक्तीवर विश्वास ठेवणे, सातत्याने प्रयत्न करत राहणे आणि कठीण प्रसंगांमध्येही धैर्य दाखवणे हे जिंकण्याचे सूत्र आहे. म्हणूनच, आपण जिंकणार आहोत हे मनाशी पक्के ठेवा, कारण मानसिक बळ हीच खरी शक्ती आहे!
---------
मन्या : काय रे गण्या, काय झालं?
गण्या : आज बँकेतून फोन आला होता.
मन्या : मग काय झालं?
गण्या : म्हणत होते, सर! तुमच्या खात्यात इतके पैसे आहेत,
त्यासाठी खातं उघडायची काय गरज होती?
सर! तुमच्या घरात एखादा छोटा-मोठा डब्बा नाहिये का?
त्यात ठेवायचे होते.
---------
Related
Articles
पंतप्रधान मोदी ५ एप्रिलला श्रीलंका दौर्यावर
23 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
22 Mar 2025
शेतकर्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार
20 Mar 2025
वाचक लिहितात
20 Mar 2025
महिलांचे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले
20 Mar 2025
पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही
19 Mar 2025
पंतप्रधान मोदी ५ एप्रिलला श्रीलंका दौर्यावर
23 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
22 Mar 2025
शेतकर्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार
20 Mar 2025
वाचक लिहितात
20 Mar 2025
महिलांचे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले
20 Mar 2025
पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही
19 Mar 2025
पंतप्रधान मोदी ५ एप्रिलला श्रीलंका दौर्यावर
23 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
22 Mar 2025
शेतकर्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार
20 Mar 2025
वाचक लिहितात
20 Mar 2025
महिलांचे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले
20 Mar 2025
पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही
19 Mar 2025
पंतप्रधान मोदी ५ एप्रिलला श्रीलंका दौर्यावर
23 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
22 Mar 2025
शेतकर्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार
20 Mar 2025
वाचक लिहितात
20 Mar 2025
महिलांचे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले
20 Mar 2025
पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही
19 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्येला गळती
2
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझात चारशेहून अधिक बळी
3
बेकायदा गॅसची विक्री करणार्यास अटक
4
मनरेगा मजुरांना द्यावेत ४०० रुपये : सोनिया
5
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
6
राज्यात चार दिवस पाऊस पडणार