मीठ, फर्निचर उद्योगात मोठी वाढ   

वृत्तवेध 

भारत काळासोबत स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे. देशातील उद्योगांवर बरेच लक्ष केंद्रित केले गेले आहे. पंतप्रधान मोदीही सतत आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतात. एका अहवालानुसार, मीठ कारखान्यात २०.८४ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. फर्निचरमध्ये १०.६४ टक्के तर कचरा संकलन कारखान्यांमध्ये १६.९२ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ मार्च २०२५ रोजी उद्योगाच्या वाढीबद्दल बोलले होते. ते म्हणाले होते, मी उत्पादन आणि निर्यातीमध्ये उद्योगक्षेत्राला आत्मविश्वासाने मोठी पावले उचलण्यास सांगतो. उद्योगाच्या या पावलाला सरकार धोरणांच्या माध्यमातून पाठिंबा देईल. देशाच्या पंतप्रधानांचे हे शब्द दर्शवतात की उद्योगांकडे भारताचे लक्ष वळले आहे आणि लोकांना त्यांचे महत्त्व पटवून दिले जात असून पावले उचलण्यासही सांगितले जात आहे.
 
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी केलेले वार्षिक ‘सर्वेक्षण ऑफ इंडस्ट्रीज’ चे निकाल समोर आणले आहेत. हा अहवाल दर्शवतो की वेगवेगळ्या क्षेत्रातील कारखान्यांची संख्या अलिकडे वाढली आहे. लोकांना उद्योगाकडे आकर्षित करण्यासाठी भारतात अनेक पावले उचलली जात आहेत. याशिवाय महिलांना व्यवसाय, उद्योगाकडे आकर्षित करण्यासाठी लखपती दीदीसारख्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. यासोबतच शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाबद्दल आवड निर्माण व्हावी, याकडेही लक्ष दिले जात आहे.
 
भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. तरुणांची संख्या जास्त असल्याने भारताला तरुणांचा देश म्हटले जाते. येथिल तरुण मोठ्या प्रमाणात कामाच्या शोधात आहेत. यामुळेच भारत आता आपल्या लोकसंख्येची गुंतवणूक देशाच्या विकासात करत आहे. त्याचे परिणाम कारखान्यांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येत आहेत. अहवालानुसार २०१३-१४ मध्ये देशात २ लाख २४ हजार ५७६ कारखाने होते. २०२२-२३ मध्ये देशातील कारखान्यांची संख्या २ लाख ५३ हजार ३३४ वर पोहोचली.
 
विकासदराबद्दल बोलायचे तर, कारखान्यांच्या संख्येत बारा टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक वस्तूंची निर्मिेती करणारे कारखाने भारतात उभारले गेले आहेत. २०२२-२३ मध्ये मीठ, फर्निचर आणि कचरा गोळा करणार्‍या कारखान्यांनी रॉकेटच्या वेगाने वाढ नोंदवली आहे. इतकेच नाही तर, याशिवाय असे अनेक कारखाने आहेत, जे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

Related Articles