E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शेतकर्यांचे कृषिसाहित्याचे अनुदान बँक बचत खात्यात
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
विजय चव्हाण
मुंबई : शेतकर्यांना शेतीसाठी उपकरणे घेता यावीत म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचे ५० टक्के अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करता येते. अनुदानात वाढ करणे हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहे. कारण जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था आहे, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत सांगितले.
जयंत आसगावकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्यांचा विषय मांडताना सांगितले की, कोल्हापुरातून ६,५८५ शेतकर्यांचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी १,०३३ जणांना लाभ मिळाला. २०२४-२५ या आर्थिक वर्षांत कोल्हापूर जिल्हा परिषदेने २ कोटी १२ लाखांची तरतूद केली होती, तर २०२५-२६ साठी २ कोटी ५४ लाखांची तरतूद आहे. म्हणजे फारसा फरक नाही, असे म्हणत आसगावकर यांनी या निधीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावर जयकुमार गोरे यांनी सांगितले की, कृषी साहित्य खरेदी वा कृषीच्या इतर योजनांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नयेत आणि गरजू लाभार्थ्यांनाच त्याचा लाभ व्हावा यासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) तसेच लाभार्थींची संख्या जास्त असल्यामुळे लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड केली जाते. कृषी औजारांच्या खरेदी योजनांमध्ये आता आधी औवजारे खरेदी करून त्याची पावती द्यावी लागते असे सांगून मंत्री गोरे म्हणाले की, या औजारांच्या खरेदीनंतर ५० टक्के अनुदान लाभार्थी शेतकर्याच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे दिले जाते. लाभार्थ्यांची निवड करताना कागदपत्रांची आवश्यकता असते. पण, आता कमीतकमी कागदपत्रे सादर करावी लागतात. जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था असल्यामुळे जिल्हा परिषदांमार्फत राबवण्यात येणार्या योजनांवर किती निधी खर्च करावा, हे ठरवण्याचे अधिकारी जिल्हा परिषदांना आहेत. याविषयी सरकारने कोणत्या घटकावर किती टक्के निधी खर्च करावा याविषयी काही नियम घालून दिले असल्याची माहिती मंत्री गोरे यांनी सभागृहात दिली.
Related
Articles
पंतप्रधान मोदी ५ एप्रिलला श्रीलंका दौर्यावर
26 Mar 2025
दक्षिण कोरियातील वणव्यात १६ ठार, १९ जखमी
27 Mar 2025
अजय सेठ अर्थ खात्याचे सचिव
26 Mar 2025
वढू आणि तुळापूर बलिदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार : शिंदे
30 Mar 2025
तर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार असते
28 Mar 2025
आई-वडिलांची काळजी घेणे ही मुलांची कायदेशीर जबाबदारी
27 Mar 2025
पंतप्रधान मोदी ५ एप्रिलला श्रीलंका दौर्यावर
26 Mar 2025
दक्षिण कोरियातील वणव्यात १६ ठार, १९ जखमी
27 Mar 2025
अजय सेठ अर्थ खात्याचे सचिव
26 Mar 2025
वढू आणि तुळापूर बलिदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार : शिंदे
30 Mar 2025
तर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार असते
28 Mar 2025
आई-वडिलांची काळजी घेणे ही मुलांची कायदेशीर जबाबदारी
27 Mar 2025
पंतप्रधान मोदी ५ एप्रिलला श्रीलंका दौर्यावर
26 Mar 2025
दक्षिण कोरियातील वणव्यात १६ ठार, १९ जखमी
27 Mar 2025
अजय सेठ अर्थ खात्याचे सचिव
26 Mar 2025
वढू आणि तुळापूर बलिदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार : शिंदे
30 Mar 2025
तर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार असते
28 Mar 2025
आई-वडिलांची काळजी घेणे ही मुलांची कायदेशीर जबाबदारी
27 Mar 2025
पंतप्रधान मोदी ५ एप्रिलला श्रीलंका दौर्यावर
26 Mar 2025
दक्षिण कोरियातील वणव्यात १६ ठार, १९ जखमी
27 Mar 2025
अजय सेठ अर्थ खात्याचे सचिव
26 Mar 2025
वढू आणि तुळापूर बलिदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार : शिंदे
30 Mar 2025
तर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार असते
28 Mar 2025
आई-वडिलांची काळजी घेणे ही मुलांची कायदेशीर जबाबदारी
27 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा
2
खासदारांना भरघोस पगारवाढ
3
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
4
‘फिरकी’ने पटकावला पहिला लोकमान्य करंडक
5
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
6
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)