E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
नागपूर हिंसाचार प्रकरणी ५० जण ताब्यात
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
संचारबंदी लागू
नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणात ५० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संवेदनशील भागात संचारबंदी लागू असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, नागपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.हिंसाचार प्रकरणात पाच एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, असे नागपूरचे पोलिस आयुक्त रविंद्र कुमार यांनी सांगितले. अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका, असे आवाहनदेखील कुमार यांनी केले आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत संवेदनशील भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या भागात पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुघल सम्राट औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगरमधील कबर हटविण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी काही संघटनांनी आंदोलन केले होते. त्यानंतर, सायंकाळी साडेसातच्या सुमारास महाल परिसरातील चिटणीस पार्कमध्ये हिंसाचार उसळला. जुना भंडारा रोडजवळील हंसापुरी परिसरात रात्री १०.३० ते ११.३० च्या दरम्यान पुन्हा हिंसाचार उसळला. या हिंसाचारात जमावाने अनेक वाहने, घरे आणि रुग्णालयाची तोडफोड केली. या हिंसाचारात ३४ पोलिस कर्मचारी जखमी झाले. यामध्ये तीन अधिकार्यांचा समावेश आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे यांनी काल रुग्णालयात जखमी पोलिस कर्मचार्यांची भेट घेतली.
वातावरण बिघडवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला, असेही ते यावेळी म्हणाले. नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांती नगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सरकारच चिथावणी देत आहे : ओवेसी
नागपूरमधील हिंसाचारास मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री जबाबदार असल्याचा दावा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांची अलीकडच्या काळातील विधाने बघा. सरकारच चिथावणी देत असल्याचे यातून स्पष्ट होते, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. नागपूर हिंसाचारास फडणवीस सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही आठवड्यांपासून जी विधाने महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून केली जात आहेत, ते तपासण्याची गरज आहे. सरकारकडूनच चिथावणीखोर विधाने केली जात होती, असा आरोपही त्यांनी केला.
Related
Articles
वाचक लिहितात
02 Apr 2025
लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमान तुर्कीत उतरले
04 Apr 2025
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
04 Apr 2025
रेडी रेकनरच्या दरात वाढ
01 Apr 2025
वक्फ विधेयकाच्या निषेधार्थ आठ राज्यांत निदर्शने
05 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
30 Mar 2025
वाचक लिहितात
02 Apr 2025
लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमान तुर्कीत उतरले
04 Apr 2025
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
04 Apr 2025
रेडी रेकनरच्या दरात वाढ
01 Apr 2025
वक्फ विधेयकाच्या निषेधार्थ आठ राज्यांत निदर्शने
05 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
30 Mar 2025
वाचक लिहितात
02 Apr 2025
लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमान तुर्कीत उतरले
04 Apr 2025
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
04 Apr 2025
रेडी रेकनरच्या दरात वाढ
01 Apr 2025
वक्फ विधेयकाच्या निषेधार्थ आठ राज्यांत निदर्शने
05 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
30 Mar 2025
वाचक लिहितात
02 Apr 2025
लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमान तुर्कीत उतरले
04 Apr 2025
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
04 Apr 2025
रेडी रेकनरच्या दरात वाढ
01 Apr 2025
वक्फ विधेयकाच्या निषेधार्थ आठ राज्यांत निदर्शने
05 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
30 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात