E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
शेतातील कामासाठी आळंदीतून पाच मजुरांचे अपहरण
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
पिंपरी
: शेतातील कामे करण्यासाठी आळंदीतून पाच कामगारांचे अपहरण करण्यात आले. कामगारांना कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे शेतातील खोलीत दहा दिवस डांबून ठेवले आणि त्यांच्याकडून शेतातील कामे करून घेतली. आळंदी पोलिसांनी पाचही कामगारांची सुटका केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ ते २५ मार्च या कालावधीत घडली.
या प्रकरणी नितीन भाऊसाहेब निंबाळकर (वय-३८), गणेश भाऊसाहेब निंबाळकर (वय-३५), भाऊसाहेब निंबाळकर (वय-५०, तिघे रा. दूरगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मोहन मारुती वगरे (वय-३०, आळंदी) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोहन वगरे, देवानंद सुभाष लांबटोंगळे (रा. यवतमाळ), पप्पू गणेशराव मगर (रा. हिंगोली), मुकुलकुमार डिसुझा (रा. उत्तर प्रदेश), श्रीराम बेंद्रे (रा. परभणी) हे कामाच्या शोधात आळंदी येथे आले होते. मागील काही महिन्यांपासून ते सर्वजण आळंदी येथे राहात होते.
१४ मार्च रोजी आरोपी एका मोटारीतून आले. पाचही कामगार आळंदी येथील नगरपरिषद चौकात कामाच्या शोधात थांबले होते. आरोपींनी या कामगारांना काम असल्याचे सांगून मोटारीत बसवले. त्यानंतर पाचही कामगारांना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे नेले. तिथे एका शेतातील खोलीत डांबून ठेवले. दिवसभर कामगारांकडून काम करून घेतले जात होते आणि रात्री डांबून ठेवले जात होते. त्यांच्या कामाचा कोणताही मोबदला दिला जात नव्हता.
दरम्यान, मोहन वगरे यांनी पत्नी आजारी असल्याने तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आरोपींकडे फोन मागितला. त्यावेळी मोहन यांना पत्नी जास्त आजारी असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी गावी जाण्याची मागणी केली. मोहन पत्नीला पाहण्यासाठी आळंदीत आले असता त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ कर्जत येथे धाव घेत कामगारांची सुटका केली. आरोपींचा शोध सुरू आहे. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.
Related
Articles
दोन तृतियांश नागरिकांचा हिंदू राष्ट्राला विरोध : मणिशंकर
01 Apr 2025
रोहित, विराट यांना अ श्रेणीमध्ये कायम ठेवण्यास बीसीसीआय तयार
03 Apr 2025
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
04 Apr 2025
जसप्रीत बुमरा किमान दोन आठवडे मैदानाबाहेर राहणार
02 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
दोन तृतियांश नागरिकांचा हिंदू राष्ट्राला विरोध : मणिशंकर
01 Apr 2025
रोहित, विराट यांना अ श्रेणीमध्ये कायम ठेवण्यास बीसीसीआय तयार
03 Apr 2025
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
04 Apr 2025
जसप्रीत बुमरा किमान दोन आठवडे मैदानाबाहेर राहणार
02 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
दोन तृतियांश नागरिकांचा हिंदू राष्ट्राला विरोध : मणिशंकर
01 Apr 2025
रोहित, विराट यांना अ श्रेणीमध्ये कायम ठेवण्यास बीसीसीआय तयार
03 Apr 2025
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
04 Apr 2025
जसप्रीत बुमरा किमान दोन आठवडे मैदानाबाहेर राहणार
02 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
दोन तृतियांश नागरिकांचा हिंदू राष्ट्राला विरोध : मणिशंकर
01 Apr 2025
रोहित, विराट यांना अ श्रेणीमध्ये कायम ठेवण्यास बीसीसीआय तयार
03 Apr 2025
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
04 Apr 2025
जसप्रीत बुमरा किमान दोन आठवडे मैदानाबाहेर राहणार
02 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)