E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
नागपूरमधील संचारबंदी उठवली
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
नागपूर
: नागपूर शहरातील संचारबंदी रविवारी संपूर्णत: मागे घेण्यात आली. दंगलीनंतर काही भागांतील संचारबंदी उठवली होती. काल उर्वरित चार भागांतील संचारबंदी मागे घेण्यात आली. त्यामुळे नागपूर संचारबंदीमुक्त शहर झाले आहे.
नागपूरमध्ये १७ मार्च रोजी दंगल उसळली होती. त्यानंतर विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. त्यात कोतवाली, गणेशपेठ, तेहशील, लकडगंज, पाचपोली, शांती नगर, सक्करदरा, नंदनवन, इमामबाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलिस ठाण्यांच्या हद्दींचा समावेश होत.
छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने गेल्या आठवड्यात सोमवारी रात्री निदर्शने केली होती. तेव्हा पवित्र ओळी लिहिलेली एक चादर जाळल्याची अफवा पसरविण्यात आली होती. त्यामुळे नागपूरच्या मध्यभागांत जमावाने तुफान दगडफेक केली. सर्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याबरोबरच दुचाकी आणि वाहनांची प्रचंड नासधूस केली होती,. सुमारे सहा तासांत दंगल पोलिसांनी अटोक्यात देखील आणली होती. या प्रकरणी १०० पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
दंगलीत तीन पोलिस आयुक्तांसह ३३ पोलिस कर्मचारी जखमी झाले होते दरम्यान, विश्व हिंदी परिषदेने कोणीतरी चादर पेटवून दिल्याची अफवा पसरविली असल्याचे सांगितले. यानंतर ११ ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यापैकी नंदनगाव आणि कपिल नगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी २० मार्च रोजी तर पाचपोली, शांती नगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामबाडा येथील संचारबंदी २२ मार्च रोजी उठवली होती. नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी काल दुपारी ३ वाजता उर्वरित चार भागांतील संचारबंदी उठवत असल्याची घोषणा केली. त्यामध्ये कोतवाली, तेहसील, गणेशपेठ आणि यशोधरा नगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील भागांचा समावेश होता. संवेदनशील भागात गस्त सुरूच राहणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरचा दौरा केला होता. तेथील परिस्थितीचा त्यांनी पोलिस अधिकार्यांसमवेत आढावा घेतला होता. सार्वजनिक मालमत्तेची केलेले नुकसान दंगलखोरांकडून वसूल केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दंगलखोरांच्या मालमत्ता जप्त करण्याबरोबरच प्रसंगी मालमत्तांवर बुलडोझर चालविण्याचा इशारा त्यांनी दिला होता. पोलिस अधिकार्यांवर हल्ला करणार्यांची गय केली जाणार नाही. तसेच दंगलीतील नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे ते म्हणाले होते.
Related
Articles
लातूरच्या आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न
07 Apr 2025
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नवीन करार
08 Apr 2025
चाळकवाडी टोलनाक्यावर स्थानिकांकडूनही वसुली
08 Apr 2025
कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
10 Apr 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार : आठवले
11 Apr 2025
पादचारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे
11 Apr 2025
लातूरच्या आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न
07 Apr 2025
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नवीन करार
08 Apr 2025
चाळकवाडी टोलनाक्यावर स्थानिकांकडूनही वसुली
08 Apr 2025
कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
10 Apr 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार : आठवले
11 Apr 2025
पादचारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे
11 Apr 2025
लातूरच्या आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न
07 Apr 2025
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नवीन करार
08 Apr 2025
चाळकवाडी टोलनाक्यावर स्थानिकांकडूनही वसुली
08 Apr 2025
कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
10 Apr 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार : आठवले
11 Apr 2025
पादचारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे
11 Apr 2025
लातूरच्या आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न
07 Apr 2025
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नवीन करार
08 Apr 2025
चाळकवाडी टोलनाक्यावर स्थानिकांकडूनही वसुली
08 Apr 2025
कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
10 Apr 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार : आठवले
11 Apr 2025
पादचारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे
11 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
6
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज